शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

तालुक्यातील विस ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायतींनी दीली वाळु घाटांना मान्यता.

तालुक्यातील विस ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायतींनी दीली वाळु घाटांना मान्यता.
पाथरी-तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात एकुण विस वाळु-घाट असुन या वर्षात लीलावासाठी पाच ग्रामपंचायतींनीच मान्यता दीली आहे.यासंदर्भातील अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर भुजल सर्वेक्षण यंत्रणा,गोण खणीज अधिकारी यांच्याकडून दोन दीवसापुर्वी या वाळु घाटांची पाहणी करण्यात आली.
   पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात नाथरा ते मुद्गल पर्यंत एकुण विस वाळु घाट आहेत.गत वर्षात वाळु घाटातुन मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा करण्यात आला आहे. लिलाव झालेल्या घाटातुन परवाणगीपेक्षा जास्त कीतीतरी पटीने वाळुचे उत्खनन होत असते.शासनाला महसुल मिळत असला तरी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो.त्यामुळे ग्रामसभांची मान्यता दीली जात नाही.कान्सुर,उमरा आणी गुंज येथिल गावकरी लिलाव झाला तरी उपसा करण्यास प्रतिबंध घालतात. त्यामुळे येथिल वाळुघांटाचे लिलावं होतं नाहीत. या वर्षीचे लिलाव झाले नसल्याने मध्यरात्री दोन वाजल्यापासून सकाळ पर्यंत गोदावरी काठच्या  भागात वाळु चोरी होते. 2019-20 या वर्षात गोदावरी नदीच्या पात्रात वाळु घाटांच्या लीलावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रासभेची शिफारस घेण्याबाबत तहसील कार्यालयाला कळविण्यात आले होते.त्यानुसार ग्रामसभेने घेतलेल्या ठरांवाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.दोन दीवसापुर्वी नदीच्या पात्रातील वाळु घाटांचा लीलाव संदर्भात पाहणी करण्यासाठी  जिल्हा गौण खनिज अधिकारी,भुजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी आणी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुंज,उमरा,कान्सुर येथिल वाळुघांटाची पाहणी केली.आत्ता हे अधिकारी आपला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणार आहेत.त्यानंतर जिल्हाधिकारी या वाळुघाटाच्या लिलावासंर्भांत निर्णय घेणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...