बुधवार, ३१ जुलै, २०१९
संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने उमरा येथे आरोग्य शिबिर संपन्न
गुरुवार, २५ जुलै, २०१९
विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बैल दगावला,मजुर मात्र बाल-बाल बचावला
विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा बैल दगावल्याचे बोलले जात आहे कारण मागील महीण्यापुर्वी अशोक शिंदे यांच्या शेतातुन विज वितरन कंपनीने पोल रोवले आहेत या पोलला जी तानतार लावली जाते त्याला चिमनी लावली नसल्याने या तान तारेत विज उतरली आणी हा बैल दगावला त्यात मजुर मात्र बाल-बाल बचावला.अशोक शिंदे यांनी विज वितरन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता वितरन कंपनीचे अभियंता मठपती यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली.तर अशोक शिंदे यांनी विज वितरण कंपनीच्या विरोधत पाथरी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
मंगळवार, २३ जुलै, २०१९
संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने हादगाव येथे आरोग्य शिबिर सपन्न.
संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने हादगाव येथे आरोग्य शिबिर सपन्न.
संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने हादगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 23/07/2019 रोजी घेण्यात आले.
शिबिराची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. नंतर संस्थेचे समन्वयक विठ्ल साळवे यानी प्रस्ताविक केले, या नंतर प्रत्यक्ष लोकांची आरोग्य तपासणी करून त्याना औषधउपचार देण्यात आले.
या आरोग्य शिबिरात हादगाव PHC चे डॉ.चिस्ते सर यानी रुग्णाची तपासणी केली.या आरोग्य शिबिरात 52 किशोरी मुलींची, 13 गरोदर मातांची, 14 स्तनदा महिलांची, 0 ते 1 वयोगटातिल 24 मुलांची, 1 ते 5 वयोगटातील 47 मुलांची व इतर 73 रुग्णाची असे एकुण 223 रुग्णाची तपासणी करुन त्याना औषध वाटप करण्यात आले.
या आरोग्य शिबिरास डॉ.चिस्ते सर, कुलकर्णी सर MPW, मस्के सर MPW, बोत सर, आण्सारी सर ,कांबळे सर अंगणवाडी ताई शिला नखाते, वंदना गायकवाड,सीमा लालझरे, अरुणा नखाते व साजन शेख हे उपस्थीत होते.आरोग्य शिबिर सम्पन करण्यासाठी संकल्प संस्थेचे बाळासाहेब खोपे, विठ्ल साळवे ,शंकर होगे,सावन जोंधळे, प्रतिभा अभोरे, सुरेश लालझरे , अरुणा आठवले, सतिश तोडके, पुजा गाडे, अन्कुश कांबळे, सतिश तोडके ,निशा पंडीत,राणी आवटे,पुजा कदम ,वैजेनाथ कसबे यानी परिश्रम घेतले.
रविवार, २१ जुलै, २०१९
टि व्ही 9चे परभणी प्रतिनिधी शेख सलीम यांचे निधन
टि व्ही 9चे परभणी प्रतिनिधी शेख सलीम यांचे निधन
परभणी येथील टि व्ही नाईन या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी शेख सलीम यांचे आज (दि-२१)रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हैद्राबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. मृत्यु समयी त्यांचे वय (४२)वर्ष होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे समजले आहे.
त्यांच्या अचानक निधनाने पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच स्नेही परिवार जनात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख सलीम यांच परभणी जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक होतं. त्यांच्या पश्चात पत्नी आई-वडील एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.
उद्या सकाळी परभणी येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळाले आहे.
शनिवार, २० जुलै, २०१९
बंडलात फाटक्या नोटा असल्याची थाप मारून बँकेतून २० हजार पळवले
बंडलात फाटक्या नोटा असल्याची थाप मारून बँकेतून २० हजार पळवले
___________________________________
पाथरी - कासापुरी येथील सीताराम आगलावे हे बँकेतून५० हजार काढून परत निघताना एकाने तुमच्या बंडलात फाटक्या नोटा असल्याची थाप मारली. आगलावे नोटांची तपासणी करत असताना हातचलाखी करून दोघांनी त्यातील २० हजार ५०० रुपये पळविल्याची घटना पाथरी येथील वाल्मिकी बँकेत दुपारी २ वाजता घडली.
रोख रक्कम काढण्यासाठी बँकेत आलेल्या नागरिकांवर नजर ठेवत त्यांनी बोलण्यात गुंतवून रक्कम पळविण्याचे प्रकार शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. आज दुपारी कासापुरी येथील सीताराम आगलावे हे येथील वाल्मिकी बँकेत आले. त्यांनी बँकेतून ५० हजार रुपयांची रक्कम काढली. बँकेत नोटा मोजत असताना अचानक दोघेजण त्यांच्या जवळ आले. बंडलात खराब नोटा असल्याचे सांगत त्यांनी आगलावे यांना नोटा मोजण्यासा मदत करतो असे सागितले. काही नोटा खराब आहेत बदलून घ्या असे सांगत त्यांनी आगलावे यांना रोखपालाकडे पाठवले. या दरम्यान,दोघांनी २० हजार ५०० रुपये घेऊन तेथून पोबारा केला.आगलावे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व प्रकार कैद झाला असून पोलीस याच्या आधारावर तपास करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक डी डी शिंदे यांनी दिली.
सोमवार, १५ जुलै, २०१९
मतदार नोंदणीसाठी मा.जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांचे आवाहन
मतदार नोंदणीसाठी मा.जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांचे आवाहन
परभणी / लक्ष्मण उजगरे
गामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आक्टोबंर २०१९ मध्ये प्रस्तावित असुन मा. भारत निवडणुक आयोगाने मतदार नोंदणी, वगळणी आणि मतदार यादीतील सुधारणा करण्यासाठी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार मा.जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी परभणी जिल्हयातील नागरीकांना मतदार यादीत नाव नसल्यास, पात्र मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन केले आहे.
मा.भारत निवडणुक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि.१५ जुलै २०१९ रोजी सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी होणार आहे. दि. १५ जुलै २०१९ ते ३० जुलै २०१९ नागरीकांकडुन दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. दि. २०, २१, २७, २८ जुलै रोजी विशेष मोहिमा घेतल्या जाणार असुन या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) आपल्या मतदान केंद्रावर हजर राहणार असुन दि. १९ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. सदर पुनरीक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर घेतला जाणार आहे म्हणजे ज्यांच्या वयाला १ जानेवारी २०१९ रोजी १८ ( अठरा ) वर्ष पुर्ण झाली असतील अशा व्यक्तीस आपले नाव मतदार यादीत नोंदवता येईल.
आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ध्यानात घेता पात्र मतदारांना नाव नोंदणीसाठी ही अखेरची संधी असल्याचे मा.जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी सांगितले.
सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय आपले प्रतिनिधी म्हणजे BLA ( Booth Level Agent ) नियुक्त करावेत व मतदार यादया अदयावत आणि शुध्द करण्यासाठी BLO यांच्याशी समन्वय ठेवावा असे आवाहन मा.जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
अतिमहत्वाच्या व्यक्तींची नावे चुकीने वगळली जावु नयेत यासाठी डेटाबेस मध्ये चिन्हांकन ( Flagging ) करण्यात येणार आहे तसेच दिव्यांग व्यक्तींच्या नावाला चिन्हाकिंत केले जाणार आहे.
मा.जिल्हाधिकारी जिल्हयातील ५० प्रकरणांची पडताळणी स्वतः करणार आहेत यात २० प्रकरणे मतदार नोंदणीची, २० मतदार वगळणीची आणि १० प्रकरणे मतदार यादीतील सुधारणे संदर्भातील असतील.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका ध्यानात घेता मतदार यादी शुध्द व अदयावत ठेवण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी, राजकीय पक्षांचे BLA या विविध पातळयांवर समन्वय आणि नियोजन करण्यात आले आहे.
परभणी येथे राज बेलदार संघटनाच्या वतीने हजयाञेकरुचा सत्कार.
परभणी येथे राज बेलदार संघटनाच्या वतीने हजयाञेकरुचा सत्कार.
परभणी / प्रतिनिधी
दि.१५: मुस्लीम धर्मियाचा पविञ अशा मक्का मदिना याञेस सुरुवात होत असुन हज याञासाठि परभणी शहरातील भाविक मोठ्याप्रमाणात जाणार असुन या निमित्त हज याञेकरुचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन राज बेलदार समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि बेलदार यांच्या वतीने दि.१४ जुलैरोजी दर्गारोड येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात पविञ कुराणचे पठण करुन करण्यात आली या नंतर हज याञेस जाणाऱ्या हाजीचा शाल हार घालुन स्वागत करण्यात आले तसेच उपस्थीत असलेले मान्यवराचे हि सत्कार करण्यात आले .यावेळी व्यासपिठावर नगरसेवक अली खान,अब्दुल माजीद,गौस भाई,करीम बेलदार ,कौसर हुसैनी यांच्यांसह हाजी उपस्थीत होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज बेलदार संघटना महाराष्ट्र संघटक मुस्तखीम बेलदार,जब्बार बेलदार,विखार बेलदार ,ईफतेखार बेलदार,रेहान खान,फहद बेलदार यांच्यासह राज बेलदार समाजसेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारि व मिञमंडळ यांनी परीश्रम घेतले.
शुक्रवार, १२ जुलै, २०१९
डिक्की देशभरात दलित आदिवासी तरुणांना उद्योजक करणार -मिलिंद कांबळे,परभणीतील 14 तरुणांना एलपीजी टँकर चे वितरण
*डिक्की देशभरात दलित आदिवासी तरुणांना उद्योजक करणार -मिलिंद कांबळे*
-- परभणीतील 14 तरुणांना एलपीजी टँकर चे वितरण --
पुणे --- केंद्र सरकारच्या स्टँडप योजनेअंतर्गत तसेच डिक्की (दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स )आणि बँक बडोदा यांच्या संयुक्त विदयमाने डीक्कीचे संस्थापक पदमश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते मराठवाडा विभागातील 14 तरुणांना आज टँकरचे वितरण करण्यात आले .या वेळी बँक ऑफ बडोदाचे डेप्युटी झोनल हेड हरिष चांद ,बँक ऑफ बडोदाचे पुणे झोनचे मुख्य व्यवस्थापक नितीन जमाणिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे कांबळे म्हणाले की ,आता राज्य सरकारच्या नवीन धोरणे नुसार राज्य सरकार 15 % सहभाग व केन्द्र शासन 25 % असे मिळून 40%सहभाग शासन देणार असल्याने यापुढे येत्या काळात शासनाच्या सहयोगाने डिक्की दलित आदिवासी समाजातील तरुनांना व्यवसायात सक्षमपणे उभे करण्याचे काम करणार आहे.
यावेळी नितीन जमाणिक म्हणाले की ,बँका या सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठीच आहेत उपेक्षित माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बँका करू शकतात आणि डिक्की ने आमच्याबरोबर मिळून काम करण्याचे ठरवल्याने आम्हाला आज गरजू लोकांना मदत करता येत आहे .
या वेळी डिक्कीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज आदमाने ,पुणे प्रेसिडेंड अशोक ओहोळ तसेच मराठवाडा विभागाचे प्रमुख प्रफुल्ल पंडित,परभणी समन्वयक प्रफुल्ल पैंठणे प्रकाश साळवे आदिसह लाभार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते
परभणी तीन गांजातस्कर महिलांना अटक; 1 लाख रुपयांचा गांजा जप्त
परभणी तीन गांजातस्कर महिलांना अटक; 1 लाख रुपयांचा गांजा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी शहरातील भीम नगर परिसरात गांजातस्कर अंजनाबाई लक्ष्मण गवारे या महिलेच्या राहत्या घरी छापा मारला. या ठिकाणी घराच्या अंगणात संरक्षण भिंतीच्या आतील प्लास्टीकच्या ड्रम मध्ये ३६. ८६ कि.ग्रॅ. वजनाचा हिरवट काळ्या रंगाचा उग्र वासाचा ओला सुका गांजा सापडला. या गांजाची किमती १ लाख १० हजार ५८० रुपये आहे.*
पाथरी स्मशान भुमित वृक्ष रोपण संपन्न
*पाथरी स्मशान भुमित वृक्ष रोपण संपन्न*
पाथरी/प्रतीनिधी:पाथरी येथील बौध्द,मातांग पारधी समाजाच्या स्मशान भुमीत ११/७/२०१९ रोजी मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे गोळीबारात शहीद झालेल्या तरुणांच्या स्मरणार्थ आज रोज १२/०७/२०१९ रोजी भारतीय बौध्द महासभा शाखा पाथरी च्या वतीने वृक्षरोपण आनेक शासकिय अधिकारी,पत्रकार,सामाजीक राजकिय कार्यक्रते यांच्या उपस्थीती मध्ये संपन्न
मंगळवार, ९ जुलै, २०१९
नैयकोटा गावातील बौध्दावर सामुहीक बहीष्कार कामाला लावने,किराना वस्तु देने,कटिन करने,पाणी,पिठाची गिरणी, ईत्यादीने बौध्दांना सेवादीली तर दहाहजार रुपये दंड,येवढेच काय तर जनावरांना चारा पाणी हि बंद,दवंडी देवुन बहीष्काराची घेतली बैठक ,गावातील बौध्दा मध्ये दहशतीचे वातावरन ,प्रशासनाचे हताची घडी तोंडावर बोट,प्रकरन हताळण्यास अपयशी
नैयकोटा गावातील बौध्दावर सामुहीक बहीष्कार
कामाला लावने,किराना वस्तु देने,कटिन करने,पाणी,पिठाची गिरणी, ईत्यादीने बौध्दांना सेवादीली तर दहाहजार रुपये दंड
येवढेच काय तर जनावरांना चारा पाणी हि बंद
दवंडी देवुन बहीष्काराची घेतली बैठक
गावातील बौध्दा मध्ये दहशतीचे वातावरन
प्रशासनाचे हताची घडी तोंडावर बोट,प्रकरन हताळण्यास अपयशी
परभणी/प्रतीनीधी:भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व वंचीत बहुजन आघाडीला मतदान केल्याचा मनामध्ये राग धरुन मौ.नैयकोटा ता.सोनपेठ जि.परभणी येथील बौध्दांन वर सामुहीक बहिष्कार टाकण्यात आला आसुन त्याचे पाणी,किराणा सामान,कन्टीन करने,पिठाची गिरनी वरुन दळन देने,कामाला लामने बंद केले येवढेच काय तर जनावरांना चारा पाणी हि देने बंद केले आहे ज्यांनी वरिल सेवा किवा वस्ती दिल्या तर त्याला दहा हजार रुपये दंड लावला जाईल आसा ठरावच दंवडी देवुन बोलावलेल्या बैठकीत घेतला आहे या मुळे गावातील बौध्दा मध्ये दहशहतीचे वातावरन निर्मान झाले आहे
हि माहीती मिळताच भारिप नेते प्रकाश उजागरे,युवा जि.अध्यक्ष दिलीप मोरे,उप.जि.अध्यक्ष आनंत कांबळे,बि.एन.घागरमाळे,पाथरी युवा ता.अध्यक्ष आनिल ब्रम्हराक्षे,माजी जि.अध्यक्ष यशवंत भालेराव,सोनपेठ येथील भारिप नेते रामेश्वर पंडीत,मुंढे गुरुजी,पाथरी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड,पत्रकार संघाचे जि.उपअध्यक्ष दादाराव ढवळे,पाथरी पत्रकार अध्यक्ष आवडाजी ढवळे आदीनी भेटली व गावातील बौध्द नागरीकांना दिलासा देत परिस्थीतीची माहीती घेतली
रविवार, ७ जुलै, २०१९
गाव तस चांगल पण महसूल /पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमते मूळे वेशिला टागंल
*गाव तस चांगल पण महसूल /पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमते मूळे वेशिला टागंल*
*दि 28/4/2019 पासून नैकोटा गावातील बौध्द वस्तिवर सामूहिक बहिष्कार टाकल्या नंतर या गावास अद्यापही तहसिलदार यांनी भेट दिली नाही .गावात दंवडी दिल्याची माहिती तेथील पोलिस पाटलानी पोलिस स्टेशन सोनपेठ दिली नाही*
*गावातील सप्ताह्यास परवाणा होता का?
गावात तलाठी, गिरधावर, ग्रामसेवक फिरकलेच नाही .या गावात अशीच परिस्थिती राहिली तर या गावातील बौध्द रोजगार, अन्न, पाण्या विना कसे जगतील.
*प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन नैकुटावासींयाचे पुर्नवसन करावे.*
लक्ष्मण उजगरे/परभणी:-कोणत्याही गावात गंभीर सामाजिक वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि तो वाद पोलिस प्रशासनाने मिटवण्या साठी पोलिस प्रशासनाने त्या गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त आध्यक्ष, सरपंच, व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढला पाहिजे आणि एवढे करूनही मिटत नसेल तर महसूल प्रशासनाची मदत घेऊन हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे मात्र सोनपेठ जि परभणी येथील महसूल /पोलिस प्रशासन यांनी नैकूटा ता सोनपेट या गावातील गंभीर वादाची गांभीर्याने दखल न घेतल्याने या गावातील प्रास्थिपताने बौध्द समाजावर गेल्या तीन महिन्यांपासून बहिष्कार टाकला आहे .
याचा पुर्वाध असा आहे की या गावात दि 27/एप्रील/2019 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना सदरील मिरवणूक गावातील मंदिरा जवळ आली या मंदिरात सप्ताह चालू असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक तेथील स्थानिक प्रस्थापितानी अडवुन धरली व पंगत उठल्या शिवाय मिरवणूक पूढे जाऊ देणार नाही आसा आक्रमक पवित्रा घेतला तद नंतर काही विचित्र प्रकार होण्या अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने मिरवणूकीचे विसर्जन न करता बौध्द वस्ति कडे आले व दुसर्या दिवशी सोनपेठ पोलीस स्टेशनला येऊन सार्वजनिक जयंती मध्ये अडथळा निर्माण करणा-यांच्या विरोधात अनुसुचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या प्रमाणे गून्हा दाखल केला याचा राग मनात धरूण येथील प्रस्थापित गावकर्यांनी गावात दंवडी दिली कि बौध्द समाजावर बहिष्कार टाकला असून गावात त्यांना कोणी मदत केली तर 10,000 रु दंड आकारला जाईल या अशा दंवडीच्या भिती पोटी गावातील किराणा, पिठाची गिरणी ,पिण्याचे पाणी,रोजगार, अँटो प्रवास, व इतर जीवनावश्यक वस्तू देणे बंद केले या बौध्द समाजाचे कामा विना रोजगारा अन्न विना भुक तर पिण्याच्या पाण्या विना तहाण भागेणाशी झाली असून यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत दिसत आहे आणि हे सर्व 28/4/2019पासुन चालू आसुन , येथील महसूल /पोलिस प्रशासन या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने पाहत नसल्याची परिस्थिती दिसत आसल्याने या गावास भारिप बहुजन महासंघ युवा जिल्हा अध्यक्ष दिलीप मोरे, लोकनेते प्रकाश उजागरे, घागरमाळे, रणजित कांबळे, अणिल ब्रम्हराक्षे, नवनाथ मुजमले, सूमित जाधव, महेंद्र ठेंगे अँड आशोक पोटभरे अवडाजी ढवळे आदींनी या गावास भेट देवून त्यांचे सांत्वन करुण न्याय मिळवून देण्यासाठी सोनपेठ जि परभणी येथील तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे
शनिवार, ६ जुलै, २०१९
आमदार विजय भांबळे यांच्यावर जिंतुर पोलिसांत गुन्हा दाखल,आमदार विजय भांबळे यांच्याकडून न.प.कर्मचाऱ्यास मारहाण,जिंतूर पोलीस ठाण्यात आमदारां विरोधात गुन्हा दाखल
आमदार विजय भांबळे यांच्यावर जिंतुर पोलिसांत गुन्हा दाखल
*आमदार विजय भांबळे यांच्याकडून न.प.कर्मचाऱ्यास मारहाण*
"जिंतूर पोलीस ठाण्यात आमदारां विरोधात गुन्हा दाखल"
प्रतिनिधी:-जिंतूर येथील नगर परिषदेच्या घरपट्टी व नळपट्टी वसुलीसाठी दबाव तंत्राचा वापर करत कर्मचाऱ्यास जिंतूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.विजय भांबळे यांनी घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवार दि.०५ जुलै २०१९ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी रात्री १०-३० वाजेपर्यत जिंतूर पोलिस स्थानकात गोंधळ सुरु होता रात्री उशिरा आ.भांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर नगर परिषदेचे कर्मचारी दत्तराव विश्वनाथ तळेकर यांच्या कडे कर विभागाचा कार्यभार आहे. शहरातील एकलव्य शाळेची नळपट्टी व घरपट्टी वसूलीसाठी आ.विजय भांबळे यांनी श्री.तळेकर यांना शुक्रवारी घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांच्यावर या कामासाठी दबाव टाकण्यात आला असे तळेकर यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे. या कामासाठी आ.भांबळे यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दत्तराव तळेकर यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी आमदार विजय भांबळे यांच्या विरोधात कलम ३५३,३३२,५०४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सोमवार, १ जुलै, २०१९
विद्यार्थांनी यशाचे शिखर गाठत आसतांना सामाजीक बांधीलकी जपावी...........विश्वनाथ झोडपे सर
विद्यार्थांनी यशाचे शिखर गाठत आसतांना सामाजीक बांधीलकी जपावी...........विश्वनाथ झोडपे सर
पाथरी/प्रतीनिधी:विद्यार्थांनी शिकुन सौरुन मोठे यश संपादन करावेत नवनवीन प्रशासकियपद संपादन करावेत परंतु यश संपादन करत असतांना सामाजीक बांधीली कि ही जपावी आसे प्रतीपादन पाथरी येथे दहावी बारावी च्या गुनवंत विद्यार्थांच्या सत्कार समारंभा प्रसंगी भारतीय बौध्द महासभेचे जि.अध्यक्ष विश्वनाथ झोडपे यांनी केले
भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरीच्या वतीने प्रतीवर्षा प्रमाने या हि वर्षी दहावी बारावी बोर्ड परिषा मध्ये घवघवीत यश संपादन करणार्या विद्यार्थांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता व भारतीय बौध्द महासभा परभणी च्या नुतन कार्यकारनीचा सतकार समारंभ दि.३०/६/२०१९ रोजी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह भिमनगर पाथरी येथे आयोजीत करण्यात आला होता या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टि.एम.शेळके सर हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन जि.कोषाध्यक्ष आशोकराव कांबळे सर,भारिप नेते प्रकाश उजागरे,माजी नगर सेवक विठ्ठल साळवे,माजी नगर सेवक लक्ष्मन कांबळे,भारिप नेते शामराव ढवळे,पत्रकार राजकुमार गायकवाड,जि.सौरक्षन सचिव शुध्दोधन शिंदे,माजी ता.अध्यक्ष बि.एन.वाघमारे,बि.एन.घागरमाळे,वामनराव साळवे,के.आर.बुरखुंडे,तलाठी सावंत साहेब,महिला उपअध्यक्षा विमलबाई ढवळे,सोनाबाई लांडगे आदी प्रमुख उपस्थीत होते या वेळी भारतीय बौध्द महासभेच्या परभणी जि.अध्यक्षपदी विश्वनाथ झोडपे,कोषध्यक्षपदी आशोक कांबळे,सौरक्षन सचिवपदी शुध्दोधन शिंदे यांची निवड झाल्या बद्दल विषेस सत्कार करण्यात आला या नंतर गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना पाथरी येथे सेवा देत सेवा निवृत झालेले समाधन आवसरमल व हरिभाऊ साळवे यांचा सत्कार करण्यात आला या नंतर दहावी बारावीतील विद्यार्थी प्रज्ञा बुरखुंडे,आनुष्का ढवळे,साक्षी वाघमारे,निलेश ढवळे,विशाखा ढवळे,कपील घागरमाळे सहीत आनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा उपस्थीत मान्यवरांच्या हास्ते सत्कार करण्यात आला पुढे बोलतांना झोडपे सर म्हणाले कि आंबेडकरी चळवळी मध्ये कार्यकतांना प्रतेक कार्यक्रत्यांनी उपकार संमजुन काम नकरता करतव्य समजुन समाजातील उपेक्षीत,वंचीत घटकांना न्याय मिळवुन देण्यासाठी कार्यकरावे आसी आपेक्षा व्याक्त केली या कार्यक्रमाचे प्रस्तावीक आर.एस.शिंदे सर यांनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार आवडाजी ढवळे यांनी केले तर शेवटी आभार बि.एन.वाघमारे यांनी मानले या कार्यक्रमासाठी डाॅ.अधिकार घुगे,डाॅ.मनेरे,संतोष ढवळे,रोहित सवळे,रोहित ढवळे,बाबासाहेब कांबळे,संघर्ष ढवळे आदीनी परिश्रम घेतले
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...