शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

आत्ताच्या पिढीने दुष्काळ पाहिला तुमची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही :-मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,वॉटर ग्रीडच्या माध्यमातून लवकरच परभणी जिल्ह्यात पाणी

*आत्ताच्या पिढीने दुष्काळ पाहिला तुमची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही :-मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस*

*वॉटर ग्रीडच्या माध्यमातून लवकरच परभणी जिल्ह्यात पाणी*
परभणी(लक्ष्मण उजागरे)मागील चार वर्षापासून राज्यात दुष्काळ पडत आहे दुष्काळामध्ये आमच्या सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत केली आहे मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत असून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वाटर ग्रीड करण्यात येणार आहे, कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा महत्वकांक्षी निर्णय आमच्या सरकारने घेतला असून मराठवाड्याचा कायमचा दुष्काळ मुक्त करण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पाथरी येथे सभेत बोलताना केले
    गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रा परभणीत दाखल झाली त्याच अनुषंगाने सेलू येथे बोर्डीकर मैदानावर सभा घेऊन ही महाजन आदेश यात्रा पाथरी कडे निघाली व पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण येथे महाजनादेश यात्रा येताच पाथरीचे विद्यमान आमदार मोहन फड यांनी या यात्रेचे जंगी स्वागत केले व येथून 500 मोटर सायकल व महाजन आदेश यात्रेचा ताफा पाथरी शहरात चारच्या सुमारास दाखल झाला व या यात्रेच्या निमित्ताने पाथरी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलत होती व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर ,आमदार मोहन फड, माजी आमदार विजयराव गव्हाणे,भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, उपाध्यक्ष डॉक्टर उमेश देशमुख, तालुका अध्यक्ष उद्धव नाईक शहराध्यक्ष शिवाराज नाईक सुरेश भुमरे अंकुश लाड आनंद भरोसे, शशिकांत देशपांडे,रामप्रसाद बोर्डीकर, सुभाष आंबट, नानासाहेब वाकणकर, उद्धव श्रावणेआदींची उपस्थिती होती.
         पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मराठवाड्याचा दुष्काळ घालवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून महत्वकांक्षी प्रकल्प वाटर ग्रीड राबविणार आहोत यामध्ये धरणांना एकमेकांशी जोडले जाणार आहे व त्यातून पाणी गावा गावा पर्यंत व शहरापर्यंत पोहोचले जाणार आहे आणि साधारणपणे वीस हजार कोटी रुपये या वाटर ग्रीड ला लागतील असा अंदाज आहे.पहिल्या टप्प्यात दहा हजार आठशे कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आहे त्यामाध्यमातून 64000 किमी पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी चार हजार कोटी रुपयाचा निविदा निघाले असल्याने या योजना पूर्णत्वास येऊन मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर दुसऱ्या योजनेतून कोकणातील वाया जाणारे 167 टीएमसी पाणी बोगद्याच्या माध्यमातून मराठवाड्यात आणले जाणार आहे या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तसेच कृष्णा खोऱ्यातील कृष्णा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणून सोडणार आहोत असे महत्त्वकांक्षी निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे त्याचा फायदा परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याला होणार असल्याचे या माध्यमातून  संपूर्ण मराठवाड्याला  मुबलक पाणी उपलब्ध होऊन  कायमचा मराठवाडा  दुष्काळा मुक्त होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पाथरी येथील महाजनादेश यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या पाथरी येथील सभेमध्ये केले

*भाजपा विधानसभा स्वबळावर लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे  संकेत*

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी परभणी जिल्हा ढवळून काढला.सेलू पाथरी परभणी येथे जाहीर सभेमध्ये त्याने महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर माझ्यासह जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी मेघना बोर्डीकर पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी मोहन फड परभणी विधानसभा मतदारसंघासाठी अभय चाटे आणि आनंद भरोसे ,गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी विजय गव्हाणे विठ्ठल रबदडे  यांच्यासाठी जनादेश मागितला.

     जाहीर सभेत जनादेश देणार का असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विचारलं, तेव्हाच भारतीय जनता पक्षाची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे याचा अंदाज येतो आहे....!!
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या सोबत असलेली युती होणार नसल्याचे संकेतही यानिमित्ताने मिळत आहेत.जिंतूर परभणी पाथरी या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेला प्रतिसाद मिळाला असला तरी भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत दृष्टीने प्रयत्नशील आहे.आणि त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातील निवडक नेत्यांनाच पुढे करून जनादेश मागितला आहे प्रारंभी मोदी साठीनंतर स्वतःसाठी आणि नंतर इतरांसाठी त्यांनी मागितलेला जनादेश बरेच काही सांगून जातो.
वास्तविक परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो भारतीय जनता पक्षाला मागच्या विधानसभा निवडणुकीत अनेक हादरे परभणी जिल्ह्यात बसले.
एवढे असतानादेखील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली ..... त्यामुळे शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निवडून आले याचा उल्लेखही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सभेमध्ये आवर्जून केलाय.भारतीय जनता पक्षाच्या पाठबळामुळेच खासदार निवडून आल्याचे ते म्हणालेत.
एकंदरीतच महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाची परभणी जिल्ह्यातील ताकद पाहिली आणि त्यानंतर आता स्वबळाचा निर्णय होतो की काय याकडेच सर्वांचे लक्ष वेधले गेले

परभणीत भाजपा इच्छुकांच्या मुलाखती घेणार राज्याचे मंत्री!!सीएम जाताच क्षणी निर्णय.. बघा स्वबळ!!.
 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.... परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला तीन मतदारसंघात प्रत्यक्ष जाहीर सभा घेतल्या.भारतीय  जनता पक्षाची वाटचाल स्वबळावर निवडणुका लढविण्याची आहे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आणि त्याच धर्तीवर अनेक घडामोडी देखील घडत आहेत.
 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी हिंगोलि जिल्ह्या कडे रवाना झाले.त्यानंतर परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विशेष निरीक्षक म्हणून राज्यमंत्री येणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता आणि आता ते विद्यमान राज्यमंत्री आहेत असे संजय ऊर्फ बाळा भेगडे शनिवारी सकाळी परभणीत दाखल होत आहेत.
 परभणी येथे आल्यानंतर परभणी सह जिंतूर गंगाखेड आणि पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती ते घेणार आहेत.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे स्वबळाची भाषा असल्याचे चर्चिले जात असतानाच परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना शनिवारी मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यमंत्री भेगडे सकाळीच परभणी येथे दाखल होतील आणि तातडीने मुलाखती  घेतील.परभणी जिंतूर पाथरी आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार कशा पद्धतीचे शक्तिप्रदर्शन करणार हाही प्रश्न उद्या दिसेल पक्षनिरीक्षक राज्यमंत्री भेगडे आपला अहवाल तातडीने वरिष्ठांकडे सादर करणार आहेत पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे या तातडीच्या घडामोडी घडत आहेत.....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाला जनादेश सर्वच ठिकाणी मागितला त्याच मुळे स्वबळाची निवडणूक होते की काय अशी शक्यता वाढली आहे..

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

परभणीत 2 दिवस मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सभांचा धडाका

परभणीत 2 दिवस मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' यात्रा; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सभांचा धडाका

 *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परभणी जिल्ह्यात गुरुवारी जालना रोडवरील देवगाव फाटामार्गे आगमन होणार आहे. या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर त्यांची दुपारी 1 वाजत सेलू येथील पाथरी रोडवरील बोर्डीकर मैदानावर तर पाथरीत जील्हापरीषद मैदानावर सभा होणार आहे.*
पाथरी येथे होणार्या सभेची पुर्व तयारी पाहताना आमदार मोहन फड,अंकुश लाड,नाईक सर,मोईज अन्सारी आदी पदाधिकारी


परभणी - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी आणि शुक्रवारी, असे 2 दिवस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणी दौरा करणार आहे. राजकीय दृष्ट्या परभणी जिल्ह्यात कमजोर असलेले भाजपचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न या यात्रेतून केला जाणार आहे. तसेच या दौऱ्यात युतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप सभा घेऊन वातावरण निर्मिती करणार आहे.हेही वाचा - फेल झालेल्या फडणवीस सरकारची पास होण्यासाठी 'जनादेश' यात्रा- नाना पटोले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परभणी जिल्ह्यात गुरुवारी जालना रोडवरील देवगाव फाटामार्गे आगमन होणार आहे. 
       या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर त्यांची दुपारी 1 वाजत सेलू येथील पाथरी रोडवरील बोर्डीकर मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सेलू येथून सिमूरगव्हाण मार्गे ते पाथरीत दाखल होणार असून या ठिकाणी जिल्हा परिषद मैदानात दुपारी 3 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर, परभणीत शुक्रवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ते वसमत रोडवरील असोला व झीरोफाटा येथे स्वागत घेऊन पुढे हिंगोली जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहेत.शिवसेनेच्या वाट्यातील विधानसभा मुख्यमंत्री गाजवणार -दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा प्रामुख्याने युतीत शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात होणार आहे. मागच्यावेळी स्वतंत्र लढल्याने पाथरीत भाजपचे सहयोगी तथा अपक्ष आमदार मोहन फड विजयी झाले आहेत. तर परभणीत शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील हे विद्यमान आमदार आहेत. जिंतूर सुद्धा शिवसेनेच्या वाट्याला असते. जिल्ह्यातील एकमेव गंगाखेड मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला येतो. मात्र, या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार नाही. 

केंद्राप्रमाणे आता राज्यातही विरोधी पक्षनेता राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
         शिवसेनेच्या परभणी, पाथरी आणि जिंतूर-सेलु या तिन्ही मतदारसंघात हा दौरा केला जात आहे. त्यामुळे युती तुटल्यास या मतदारसंघात भाजपने पूर्वतयारी म्हणून हे नियोजन केले असावे, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. तसेच आजपर्यंत कुठल्याही स्वरूपात जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना सत्तेची फळे चाखता आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यात मरगळ आलेली आहे. परिणामी, त्यांच्यात ऊर्जा यावी, म्हणून मुख्यमंत्र्यांचा या यात्रेच्या निमित्ताने एक प्रयत्न असणार आहे. त्यात ते किती यशस्वी होतात, हे त्यांची यात्रा झाल्यानंतरच स्पष्ट होईल.हेही वाचा - येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेत ग्वाही महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्याचे भाजप प्रभारी तथा पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी 3 दिवसांपूर्वी जिल्हा दौरा करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यात्रेच्या तयारीसाठी पाथरीचे आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, यात्रा दिन प्रमुख शशीकांत देशपांडे, सहप्रमुख राजेश देशपांडे, माजी माजी आमदार विजय गव्हाणे, महिला नेत्या मेघना बोडीकर-साकोरे, माधव सानप, समीर दुधगावकर, संजय साडेगावकर, प्रमोद वाकोडकर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.पाथरी येथे सभा मंडपाच्या कामाची पाहणी करताना आमदार मोहन,अंकुश लाड, सुरेश भुमरे ,उद्धव नाईक , अनंत गोलाईत , उमेश देशमुख ,शिवराज नाईक ,मोईज अन्सारी , पप्पू नखाते पदाधिकारी उपस्थित होते.या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे अव्हाहन आमदार मोहन फड यांनी केले आहे.

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

पाथरी विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नाही : खा.संजय जाधव साहेब

परभणी/प्रतिनिधी- पोखर्णी (नृ) येथे श्री नृसिंह अभिषेक कीर्तन व महाप्रसाद तसेच शिवसेना पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन काल माझ्या वतीने करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब उर्फ बॉस मेळाव्यास उपस्थित होते.

यावेळी बोलताना बॉस म्हणाले, "आपला उमेदवार म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा धनुष्यबाण आहे. आपल्याला येत्या काळात या धनुष्यबाणालाच निवडून आणण्याचं काम करायचं आहे. जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा पक्ष हा फक्त शिवसेनाच आहे. जनतेशी आपली नाळ जोडल्याशिवाय फळ मिळत नाही. आम्ही ती नाळ जोडण्याचा काम आतापर्यंत करत आलो आहोत. ही शिवसेना बाळासाहेबांनी प्रेरित केलेली शिवसेना आहे. माझा अखेरचा श्वास सुद्धा मी शिवसेनेतच घेणार आणि पाथरी मतदार संघात भगवा फडकिल्याशिवाय शांत बसणार नाही"
.

तर माझे मनोगत व्यक्त करताना, "शेतकऱ्याच्या कोणत्याही अडचणींना धाऊन जाणारा पक्ष म्हणजे तो फक्त शिवसेनाच आहे. येत्या काळात ज्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC परिक्षांची तयारी करण्याची आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र आणण्याचा प्रयन्त करणार, मतदारसंघात रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतार. शिवसेनेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन, या पाथरी मतदार संघावर भगवा फडकविणारच!" असा विश्वास मी उपस्थितांना दिला.

मेळाव्यास मुख्य मार्गदर्शक खासदार संजय जाधव साहेबांसह जिल्हाप्रमुख सुरेशबप्पा ढगे, युवासेना युवा जिल्हाप्रमुख दीपकभाई बारहाते, पंढरीनाथ धोंडगे, मधुकर निरपणे, बाळासाहेब जाधव, अशोक वाघ, माणिक आव्हाड, आत्माराम वाघ, परमेश्वर सुकरे, रामेश्वर मोकाशे व इतर सर्व पदाधीकारी उपस्थित होते.

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

राजेश विटेकर यांचे नाव घेताच गर्दीतुन टाळ्यांचा प्रतिसाद

राजेश विटेकर यांचे नाव घेताच गर्दीतुन टाळ्यांचा प्रतिसाद
 परभणी/लक्ष्मण उजागरे:-अजित दादा पवार यांनी राजेश दादा विटेकर यांचे नाव घेताच प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला निश्चित जिंतूर, गंगाखेड आणि घनसावंगीमध्ये अपेक्षा होती  परंतु  अपेक्षांचा भंग झाला. राजेश विटेकर आज खासदार झाले असते. परंतु आतादेखील हिम्मत हरायची नाही . महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात चांगल्या पद्धतीने लढायचे आहे  
विद्यमान सरकारच्या गलथान कारभाराचा निश्‍चितपणे अनुभव घेतलेली जनता आपल्या राष्ट्रवादीच्या पाठीशी राहील असा स्पष्ट दावा माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी गंगाखेड येथे शिवस्वाराज याञे बोलताना व्यत केले.

 यावेळी खा.अमोल कोल्हे ,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी,मा.खा.सुरेश जाधव आ.मधुसुदन केंद्र हे मंचावर उपस्थित होते.

*हे सरकार सामान्य जनतेवर अन्याय करणारे सरकार -*
शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील गंगाखेड येथे आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारवर ताशेरे ओढले.   
 शासकीय आणि खासगी क्षेत्रात महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र या युती सरकारच्या काळात महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, गुन्हेगारांवर कुठलाच अंकुश राहिलेला नाही, असा आरोप अजीत पवार यांनी केला.

आज राज्यात सर्वाधिक अन्याय हा मराठवाड्यावर होत आहे. मराठवाड्यासाठी हे सरकार काहीच करत नाही. शिवाय, निवडणुकीच्या तोंडावर गाजरं दाखवण्याचं काम या सरकारनं केलंय. अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस-सोयाबीन-तूर अशा अनेक धान्यांचा हमीभाव मिळालेला नाही. तर आजही तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हे सरकार सामान्य जनतेवर अन्याय करत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

आज राज्याची परिस्थिती बिकट आहे. शिक्षक, पोलिस, तलाठी यांच्या जागा रिक्त आहेत. पण हे सरकार जागा भरतच नाही. फक्त सामान्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कालच राज्य सहकारी बॅंकेवर घोटाळ्याचा आरोप फडणवीस सरकारने केला. मात्र, निवडणूक जवळ येताच असे आरोप होणे स्वाभाविक असल्याचे पवार म्हणाले.



शिवस्वराज्य यात्रेतून महाराजांच्या विचारांचे, अठरापगड जातींचे राज्य स्थापन करण्याची भूमिका मांडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धंनजय मुंडे यांनी केले. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात, आम्ही शेतकऱ्यांना विहिरी बांधून दिल्या, शेततळी दिली, ३३ कोटी झाडे लावली, या ३३ कोटी झाडांपैकी एकतरी झाड कुठे दिसलं का? जलयुक्त शिवाराचं काय झालं? असे सवाल मुंडे यांनी उपस्थित केले.

*सरकारने विमा कंपन्यांचा खिसा भरण्याचे काम केले. -*

मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या घामाचा पैशातून विमा कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम सरकारने केले. गुन्हेगारीतही मुख्यमंत्र्यांच्या नागपूरचा पहिला क्रमांक लागतो. अनेक क्षेत्रात बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार काहीच करत नाही. त्यामुळे या सरकारला जाब विचारण्याची वेळ आज आली असल्याचे खा. अमोल कोल्हे म्हणाले.

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक मदतीसाठी सदैव तयार आहे:-डाँ.जगदीश शिंदे, रक्त गट तपासणी कार्ड वाटप कार्यक्रम प्रसंगी डॉ. जगदीश शिंदे.यांचे प्रतिपादन

*शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक मदतीसाठी सदैव तयार आहे:-डाँ.जगदीश शिंदे*

रक्त गट तपासणी कार्ड वाटप कार्यक्रम प्रसंगी डॉ. जगदीश शिंदे.यांचे प्रतिपादन

पाथरी/प्रतिनिधी,:-पोहेटाकळी येथिल जिल्हा परीषद शाळेत आज ओंकार संस्थेचे डॉ. जगदीश शिंदे यांच्या वतिने विद्यार्थ्यांना रक्तगट तपासणी कार्ड वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
     
सविस्तर माहीती अशी की,तालुक्यातील पोहेटाकळी येथे डॉ.जगदीश शिंद यांनी जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांचे तपासणी केली होती त्याचाच एक भाग म्हणून आज दी 22आँगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना रक्तगट कार्ड वाटप करण्यात आले.यावेळी जगदीश शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना/विद्यार्थिनींना आपल्या आरोग्याची कशी घ्यायची यावर माहीती दीली त्याच बरोबर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कुठलीही आरोग्यविषयक उपचारासाठी लागणार्या तपासण्या व उपचार करण्यासाठी मी सदैव तयार असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. 

या कार्यक्रमाला  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम गोंगे,सरपंच भागवत कुल्थे,उपसरपंच विलास गोंगे,शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ फंड,शालेर व्यवस्थापन समीती सदस्य पत्रकार लक्ष्मण उजागरे,गणेश बागल,सखाराम वाघमारे,सुदाम उजागरे,कदम सर,मिशे सर,शिंदे सर,रोडे सर,खारकर सर,गोरे सर,पानझाडे मँडम यांच्यासह गावातील पालक नागरीक उपस्थित होते

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा प्रारंभ

*एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा प्रारंभ*

मुंबई, दि. २० : एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन दर्शविणाऱ्या तसेच ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारित करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीचा (vehicle tracking and passenger information system) आज परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या नव्या प्रणालीमुळे एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे, हे प्रवाशांना समजू शकणार आहे. तसेच बसस्थानकावर एलसीडी टीव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ कळणार आहे. आपल्या जवळील थांब्यावरून प्रत्यक्ष येणाऱ्या व सुटणाऱ्या फेऱ्यांची वेळ कळणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचे पूर्वनियोजन करता येईल व त्यांचा अमूल्य वेळ वाचणार आहे.

     एसटी महामंडळाच्या नाशिक विभाग व मुंबई - पुणे - मुंबई, बोरीवली - पुणे -बोरीवली, ठाणे - पुणे - ठाणे या शिवनेरी सेवेचा व्हीटीएस - पीआयएस प्रकल्पाचा आज लोकार्पण करण्यात आला. पुढील ५ ते ६ महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वाहनांना व्हीटीएस (vehicle tracking system) बसविण्यात येऊन सर्व महत्त्वाच्या थांब्यावर पीआयएस संच (passenger information system) बसविण्यात येणार आहे. याबाबतचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच प्रवाशांना बसचे लोकेशन समजण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात येत असून ते लवकरच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.


प्रणालीच्या प्रारंभप्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, महाव्यवस्थापक राहूल तोरो, उपमहाव्यवस्थापक सुहास जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. दिवाकर रावते म्हणाले, ‘जिथे रस्ता, तिथे एसटी’ या ब्रीदवाक्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी महामंडळ सेवा देत आहे. महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बस असून त्यामार्फत दररोज ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कामकाजात सुसूत्रता आणणे तसेच संपूर्ण कार्यक्षमतेने काम होण्यासाठी एसटी महामंडळाध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीत वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (vehicle tracking and passenger information system) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना एसटी बसचे प्रत्यक्ष स्थान कळणार आहे. प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या एसटी बस थांब्याचे, गावांचे जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे अक्षांश व रेखांशाद्वारे नकाशावर स्थान निश्चित करण्यात येत आहे. तसेच ज्या आंतरराज्य मार्गावर एसटी महामंडळाची सेवा आहे, अशा थांब्यांचेही स्थान निश्चितीकरण करण्यात येत आहे.

व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाच्या अंतर्गत एक मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई सेंट्रल येथे तयार करण्यात आलेली आहे. या नियंत्रण कक्षामध्ये व्हिडीओ वॉल तयार करण्यात आली असून तेथे एसटी बसेसचे निरीक्षण करण्यात येणार आहे. यात वाहनाचा वेग, वाहनाचे आगमन व निर्गमन तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक अहवाल प्राप्त होणार आहे.

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

केंद्रीय कन्या शाळेच्या चिमुकल्यांनी संकलित केला निधी,पुरग्रस्ताच्या मदतीला सरसावले सोनपेठ येथिल चिमुकले.

केंद्रीय कन्या शाळेच्या चिमुकल्यांनी संकलित केला निधी
सोनपेठ (प्रतिनीधी) :-सोनपेठ शहरात विविध उपक्रमात जिल्हा परिषदेची केंद्रीय कन्या शाळा नेहमीच अग्रेसर असते या शाळेच्या चिमुकल्यांनी कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी शहरातील लहान-थोर व्यापारी महिला-पुरुष लहान मुली यांच्या कडून "मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा" घोषणा देत कुणाची 1,2,5. रुपये कुणाची 10,20,50,100,200 व 500 रुपये असे शहरातून 16 हजार 100 रुपये एकूण (सोळा हजार शंभर रुपये) संकलित करण्यात आली 
       
यामध्ये विशेष दिनांक 13 ऑगस्ट 2019 मंगळवार रोजी संदीप लष्करे सरांचा वाढदिवस त्यांनीही 500/- पाचशे रुपये या निधीत भर घालून पूरग्रस्तांना मदत करूनच साजरा केला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रमेश राठोड यांनीही 500 /- पाचशे रुपये या संकलित निधीत पूरग्रस्तांना मदत दिली याप्रसंगी या अॕटोद्वारे आव्हान करताना अंजली कदम, वैष्णवी मुळे तर निधी संकलन करण्यासाठी पहिला बॉक्स सहावीच्या मुली किरण रोडे, सांची हिरवे, सिद्धी मस्के व श्रावणी अन्नपुर्णे तर दुसरा सातवी मुल वितोष मोरे, ओम जवादे व गणेश कळसकर यांनी तर तिसरा बॉक्स आठवीची मुलं शंतनु बंसोडे, सोहम महाजन व चैतन्य अंभोरे आदींसह ढोल पथक व बॅनर सागर गावडे, मनोज दहिवाळ, बनसोडे, रोहित स्वामी आदींनी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी सदस्य असे मुलांनी सर्व सदस्य व सदस्य तसेच मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, वाल्मीक लहाने, रामेश्वर राऊत, कल्याण राठोड, केशव पांचाळ, अमोल गोरे, सुनीता जोशी, नयना बारगजे, सुवर्णा गायकवाड, रंजना डोंगरे , सविता भराडे आणि प्रकाश तिरमले आदींचे विशेष सहकार्य लाभले सर्व संकलित 16100/- रुपये (सोळा हजार शंभर रुपये) मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ च्या नावे डि.डी. काढून जमा करण्यात आला आहे.

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

वाढदीवसाचा अनावश्यक खर्च टाळुन मुलीच्या वाढदीलसानिमित्त पांडुरंग कोल्हे यांनी बांधले महीला स्वच्छालय.

पाथरी प्रतिनिधी:-
    "बदलत्या काळानुसार निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करुन ग्रामीण भागातील तरुणांनी विकास करुन घ्यावा,व्यसनाधिनतेपासुन लांब राहुन कोणतेही कष्ट करण्याची तरुणांनी तयारी ठेवुन पांडुरंग कोल्हे यांच्याप्रमाणे गावातील समस्यावर उपायेजना करावी", असे आवाहन  परभणीचे शिक्षणाधिकारी व प्रसिद्ध वाख्याते विठ्ठल भुसारे यांनी केले.

    ते रविवारी पाथरी तालुक्यातील उमरा येथे प्रियल कोल्हे हिच्या  वाढदिवसानिमत्य अवांतर खर्चाला फाटा देत ,ग्रामीण महिलांची मुख्य समस्या निवारण्यासाठी गावात पांडूरंग कोल्हे यांनी उभारलेल्या महिला सार्वजनीक शौचालयाच्या 3 कँबीन लोकार्पण कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित तरुणांशी संवाद साधत होते .
   प्रारंभी विठ्ठल भुसारे  यांच्या हस्ते  फित कापुन महिला शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंजाभाऊ कोल्हे शिवसेना तालुकाप्रमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन   सेवानिवृत मुख्याध्यपक जानकीराम मोरे, सुभाष शिंदे कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ परभणी,एकनाथ मस्के,गावचे सरपंच दत्ता बिजुले,तुकाराम पौळ,सचिन निलवर्ण आदींची उपस्थीती होती.
    गावातील प्रत्येक नागरिकांने कुवतीनुसार आर्थीक व वेळ देऊन गावाच्या विकासात सहभाग घेऊन आदर्श गांव निर्माण करण्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहान शिवसेना तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांनी अध्यक्षीय समारोप करतांना केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक पांडुरंग कोल्हे यांनी केले तर सुत्रसंचालन माऊली कोल्हे यांनी केले.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

ताडलिंबला येथे विकासकामाचे भूमिपूजन...* -------------------------------------------------

*ताडलिंबला येथे विकासकामाचे भूमिपूजन...*
-----------------------------------------------------------

परभणी /प्रतिनिधी:-परभणी
विधानसभा मतदारसंघातील ताडलिंबला  येथे परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या प्रयत्नातून 2515 निधीतून गावातील सी.सी रोड च्या कामासाठी मंजूर झालेल्या 15 लक्ष रुपयांच्या कामाचे भुमिपुजन आज दि.12 रोजी परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते झाले.
  यावेळी आनंद भरोसे यांनी मनोगत व्यक्त करताना परभणी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी सदैव कटीबद्ध असून मागील साडेचार वर्षात परभणी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम,२५१५ निधी,दलित वस्ती,तांडा वस्ती निधी अंतर्गत अनेक गावात विकासकामे झालेली आहेत. समोरही ग्रामीण भागातील प्रलंबित राहिलेल्या विकासकामांना प्राधान्य देऊन ती करण्यासाठी माझा सर्वपरी प्रयत्न राहणार आहे असे प्रतिपादन यावेळी आनंद भरोसे यांनी केले.
   यावेळी सरपंच अर्जुन बागल,उपसरपंच गोविंद जोगदंड,ग्रामपंचायत सदस्य किशन देशमुख,लिंबाजी गरुड,अजित गरुड,अंगद शेरे,ग्यानदेव लोडे,विठ्ठल चव्हाण,सुरेश जोगदंड,बालासाहेब देशमुख,किशन लोडे,विष्णू तांबे,भगवान नाईकवाडे,वामन तांबे,किशन नाईकवाडे,कांतराव जोगदंड,बबन नाईकवाडे, प्रल्हाद राहटकर,ज्ञानदेव जोगदंड,मारोती लोडे,राजू ढगे,ज्ञानदेव कुटे आदी गावकरी यावेळी उपस्थितीत होते

शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

पाथरी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी मुंजाभाऊ कोल्हे यांची निवड

पाथरी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी मुंजाभाऊ कोल्हे यांची निवड
पाथरी(लक्ष्मण उजागरे):पाथरी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी मुंजाभाऊ कोल्हे यांची परभणी चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका पत्रा द्वारे निवड केल्याचे जाहीर करण्यात आले
सविस्तर वृत आसे कि शासनाच्या वतीने विधवा,निराधार,दिव्यांग,वयवृध्द नागरीकांना संजय गांधी,ईदीरा गांधी निराधार,श्रावन बाळ व ईतर या योजने च्या माध्य मातुन आर्थीक मदत केली जाते 
या योजने ची पाथरी तालुखा कमेटी परभणी जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका पत्रा व्दारे जाहीर करण्यात आली या कमेटीच्या अध्यक्षपदी मुंजाभाऊ कोल्हे यांची निवड करण्यात आली तर संतोष जोगदंड,अश्विनी वाकनकर,उध्दव नाईक,उध्दव श्रावने यांची सदस्य पदी निवड करण्यात आली सदर निवडी बद्दल सर्व स्थरातुन अध्यक्ष व सदस्य यांचे स्वगत करण्यात येत आहे

मानवत नगरीत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती आश्वरुढ पुतळाचे आगमण,आ.मोहन फड व डॉ.अंकुश लाड यांच्या अथक प्रयत्नामुळे मानवतकराची स्वप्नपुर्ती

मानवत नगरीत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती आश्वरुढ पुतळाचे आगमण 
[]आ.मोहन फड व डॉ.अंकुश लाड यांच्या अथक प्रयत्नामुळे  मानवतकराची स्वप्नपुर्ती  []
लक्ष्मण उजागरे /परभणी
दि.९:  मानवत शहरात छञपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वरुढि पुतळा उभारणीची मागणी कित्येक वर्षापासुन शिवप्रेमी जनतेतुन होत होती यासाठी पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड व युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी या कार्यासाठी अथक परीश्रम घेत लाखो रुपयाचा निधी  खर्च करत शहरातील छञपती शिवाजी महाराज यांच्या  नियोजित पुतळ्याचे जागेचे सुशोभीकरण करुन लगेच येथे पुतळा उभारणीसाठी प्रयत्न केले व दि.९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजाचा आश्वरुढ पुतळा अहमदनगर चे प्रसिध्द शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवलेली १६ फुटि उंच मुर्ति मानवत शहरात मोठ्या थाटामाटात पाथरी ते मानवत मिरवणुक व भव्य मोटरसायकल रँली  काढुन  आणण्यात आली .
९ ऑगस्ट रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक पाथरी येथील आष्टी फाट्यावरून विधिवत पूजा करून काढण्यात आली  ही मिरवणूक पाथरी शहरातील मेनरोडावरुन  वाजत गाजत मानवत शहरातील नाक्याजवळील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेपर्यंत काढण्यात आली  यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याची आ.मोहन फड  यांच्याहस्ते विधिवत पूजा करून  प्रतिष्ठापना करण्यात आली.आ.मोहन फड व डॉ.अंकुश लाड यांच्या अथक प्रयत्नामुळे  मानवतकराची स्वप्नपुर्ती आज कित्येक वर्षानंतर पुर्ण झाल्याने बहुजन समाज आ.मोहन फड व डॉ.अंकुश लाड यांचे कौतुक करत आहे . यावेळी  आमदार मोहनराव फड ,भाजपाचे युवानेते डॉ.अंकुश लाड,श्री.मनिषानंद पुरीजी महाराज,नगराध्यक्ष एस एन पाटिल ,मुख्यधिकारी उमेश ढाकणे ,नगरसेवक गिरीशसेठ कञुवार,नगरसेवक गणेश कुमावत,अन्वरभैय्या शेख,आसेफ खान,मोईज अन्सारी , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अभय चाटे, मानवत तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत ,पाथरी तालुका अध्यक्ष उद्धव नाईक, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा परभणी सुरेश भुमरे ,संजय साळेगावकर, शशिकांत देशपांडे, डॉ.उमेश देशमुख ,शिवराज नाईक ,पी डी पाटिल, नारायण भिसे, अनिरुध्द पांडे,सचीन कोक्कर ,ज्ञानेश्वर मोरे ,डॉ.योगेश तोडकरी ,सुरेश कच्छवे ,पप्पु नखाते ,सचीन मगर ,बापु जाधव,बंटिभैय्या आहिर,नितीन कुमावत यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक प्रतिष्ठित नागरीकांसह हजारोच्या संख्येने शिवप्रेमी जनता या ऐतिहासिक समयी उपस्थीत होती.

शाळेच्या सर्वागीण विकासासाठी माझा हातभार लागन माझ भाग्य:-आ.मोहन फड *पोहेटाकळी येथे आयोजित शिक्षण परिषदेत उद्घाटन आ.मोहन फड यांचे प्रतिपादन.*

शाळेच्या सर्वागीण विकासासाठी माझा हातभार लागन माझ भाग्य:-आ.मोहन फड
*पोहेटाकळी येथे आयोजित शिक्षण परिषदेत उद्घाटन आ.मोहन फड यांचे प्रतिपादन.*
पाथरी:-तालुक्यातील पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत आज दी 10 आँगस्ट रोजी शिक्षण परीषदेच आयोजन करण्यात आले होते या शिक्षण परिषदेचे उद्घाटन पाथरी विधान सभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मोहन फड यांच्या हस्थे करण्यात आले.
     या शिक्षण परिषदेच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा.व्य.समिती अध्यक्ष उत्तम गोंगे हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून केंन्द्र प्रमुख टेंगसे सर,गट.साधन केंन्द्र पाथरी येथुन दीपक रणदीवे सर,मुख्याध्यापक नवनाथ फंड,शा.व्य.समिती सदस्य पत्रकार लक्ष्मन उजागरे, मोईझ अन्सारी,पप्पु नखाते,अमोल गोंगे,केशव गोंगे आदींची उपस्थिती होती.त्या बरोबर या शिक्षण परीषदेश ७० ते ८० शिक्षक/शिक्षीका उपस्थिती होती.
यावेळी शालेय व्यस्थापन समीतीचे अध्यक्ष उत्तम गोंगे यांनी  आ.मोहन फड यांच्याकडे सभाग्रहाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
             पुढे बोलताना आ.मोहन फड यांनी शाळेसाठी कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मी शाळेच्या सर्वांगीन विकासाठी सदैव तत्पर राहील व माझ्या कडून शाळेसाठी एक लवकरात लवकर सभाग्रह देण्याचे अश्वासन दीले.यावेळी आ.मोहन फड यांच्या हस्थे  व्रक्षरोपन करण्यात आले.यावेळी शा.व्य.समीती अध्यक्ष उत्तम गोंगे,मुख्याध्यापक फंड सर यांनी शाळेत लावण्यात आलेले व्रक्ष व परीसराची भौतिक गरजांची माहीती दीली.या शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक कदम सर,मिशे सर,खारकर सर,शिंदे सर,गोरे सर,पानझाडे मँडम,शिक्षण प्रेमी भास्कर उजागरे,नवनाथ शिंदे आदींनी परीश्रम घेतले.

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या कार्याचा गौरव

भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या कार्याचा गौरव
पाथरी/प्रतीनिधी:भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरी चे अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या मार्गदर्शना मध्ये पाथरी येथे विविध सामाजीक प्रबोधन व समाज उपयोगी कार्यकरुन सेवा दिली याची दखल घेवुन परभणी येथील शासकिय रुग्णालयाच्या वतीने केला गौरव.
     भारतीय बौध्द महासभेच्या माध्य मातुन गेल्या दोन वर्षा पासुन भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद नामविस्तार दिनाच्या निमीत्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करुन आनेक रुग्णांना जिवदान देण्यास सहकार्य केले या महत्व पुर्ण कार्याची दखल घेवुन दि.०३/८/२०१९ रोजी दु.१२:३० वा. जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे परभणी येथील शासकिय रक्त पेठी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने भारतीय बौध्द महासभेचा सत्कार करण्यात आला या वेळी सत्कार स्विकार करतांना टि.एम.शेळके सर,संपादक तथा उपअध्य भा.बौ.सभा विठ्ठल साळवे,पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष आवडाजी ढवळे आदी चा परभणी महानगर पालीका आयुक्त मा.रमेश पवार यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन डाॅ.प्रभाकर टेकाळे हे होते तर प्रमुख उपस्थीती म्हणुन डाॅ.खंदारे जि.रु.परभणी,डाॅ.किशोर सुर्यवंशी,डाॅ.राठोड मॅडम,डाॅ.संजय हरबडे सेलु आदी उपस्थीत होते 
भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरीच्या कार्याचा शासकीय स्थरावर गौरव झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वृत वाहिन जि.अध्यक्ष कुलदिपके सर,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जि.अध्यक्ष साळवे सर,आयु.विश्वनाथ झोडपे जि.अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा परभणी,भारिप बहुजन महासंघ जि.अध्यक्ष मा.दादाराव पंडीत,भारतीय बौध्द महासभेचे माजी जि.अध्यक्ष आयु.राहुल गायकवाड,भारिप नेते प्रकाश उजागरे,भारिप नेते शामराव ढवळे,भारिप युवा जि.अध्यक्ष दिलिप मोरे,भारतीय बौध्द महासभेचे सौ.जि.सचीव शुध्दोधन शिंदे,माजी नगर सेवक लक्ष्मन कांबळे,भारिप ता.अध्यक्ष आशोक पोटभरे,भारिप नेते दिलिप ढवळे,पत्रकार संघाचे माजी ता.अध्यक्ष राजकुमार गायकवाड,गौतम साळवे,मधुकर शेळके,आर्जुन पाईकराव,शैलेश शामकुवर आदीने शुभेच्छा दिल्या आहेत

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...