सोमवार, ३० मार्च, २०२०
जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांचे आवाहन; जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास सुरू ठेवावी
रविवार, २९ मार्च, २०२०
सतर्क ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा आणला उघडकीस; महसूल विभागाकडून पंचनामा
शनिवार, २८ मार्च, २०२०
केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील सर्व लाभार्थीना लाभ देण्यासाठी यंत्रणेला सूचना – मुख्यमंत्री
केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील सर्व लाभार्थीना लाभ देण्यासाठी यंत्रणेला सूचना – मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेलं 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे देशातील गोरगरिब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात या योजनेतील सर्व लाभार्थीना व्यवस्थित लाभ मिळेल यासाठी राज्य शासन संपूर्ण प्रयत्न करेल. यादृष्टीने राज्यातील यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले
गोरगरिब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप, उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस, स्वस्त धान्य दुकानात रास्त भावाने अन्नपुरवठा, शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांची रक्कम, यासारख्या निर्णयांमुळे त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळित राहण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. गरीब, वृद्ध, दिव्यांग विधवा महिला यांच्या जनधन खात्यांमध्ये एक हजार रुपये जमा करण्याचा, मनरेगा कामांवरील मजुराना दरदिवशी 200 रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय योग्य आहे. केंद्र शासनाचे हे मदतीचे पॅकेज लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचे काम राज्य शासन प्रभावीपणे पार पाडेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.. या युद्धात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची भुमिका खुप मोलाची आहे. त्यांच्यासाठी विम्याचे कवच देऊन केंद्र शासनाने यंत्रणेत काम करणाऱ्यांना बळ दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एकीच्या बळावर आपण विषाणुला देशातून हद्दपार करण्यात नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी गरजेनुसार केंद्राने अशाच प्रकारे राज्यासाठी मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे
शुक्रवार, २७ मार्च, २०२०
CoronaVirus : राज्यात इतर रुग्णांवर डिजिटल प्रिस्क्रिप्शनने उपचार
Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव,कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवार, २६ मार्च, २०२०
CoronaVirus : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
देशातील गरिबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
बुधवार, २५ मार्च, २०२०
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन;जीवनावश्यक वस्तूचा साठा मुबलक असल्याने गर्दी टाळावी,आज 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले,कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी.
तरी जीवनावश्यक वस्तू , औषधी आणि अन्नधान्य , भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
*परभणी जिल्ह्यात संचारबंदी काळात कष्टकरी रोजमजूर भिकारी यांच्यावर उपासमारीची वेळ...!जिल्हाधिकारी दिपक मुगळीकरांनी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता*
परभणी जिल्ह्यात संचारबंदी काळात कष्टकरी रोजमजूर भिकारी यांच्यावर उपासमारीची वेळ...!
💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकरांनी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता💥
परभणी/संपूर्ण जगात माहामारी म्हणून उदयास आलेल्या भयंकर चिनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस,संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याची घोषणा काल मंगळवार दि.२४ मार्च रोजी केली.लोकांनी गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढवण्याचा धोका लक्षात घेऊन २१ दिवस लॉकडाऊन अर्थात संचारबंदीचा कठोर निर्णय घेण्यात आला परंतु हातावर पोट असलेल्या रोजंदारी कामगार,फिरस्ती छोटे व्यवसाईक,गोरगरीब भिकारी यांच्या उदरनिर्वाहाचे काय ? प्रश्न निर्माण झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील परभणी रेल्वे स्थानकासह पुर्णा रेल्वे स्थानक,सेलू रेल्वे स्थानक,मानवत रेल्वे स्थानक,गंगाखेड रेल्वे स्थानक पाथरी बसस्थानक,सोनपेठ बसस्थानक,पालम बसस्थानक,परिसरात वास्तव्यास असणाऱ्या व रस्त्यावर भिक मागून जिवण जगणाऱ्या गोरगरीब भिकारी तसेच वाड्या वस्त्यामध्ये,झोपडपट्यामध्ये राहणारे गोरगरीब रोजंदारी कामगार या २१ दिवसांच्या संचारबंदी काळात अक्षरशः उपासमारीने आपला जिव सोडून देतील.अश्या गोरगरीब लोकांच्या जवळ नाही पैसा नाही हाताला कुठलेच काम नाही अशा गंभीर परिस्थितीत त्यांना कोणी उधार पैसाही देणार नाही आणी एखादा दुकानदारही दुकाना पुढे उभे राहू देणार नाही मग अश्या गंभीर परिस्थितीत त्यांनी करायचे तरी काय ? प्रशासनानेच आता अशा गरीबांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता निर्माण झाली असून परभणी जिल्हा प्रशासनाने २१ दिवसांच्या संचारबंदी काळात अश्या गोरगरीब रोजमजूरांवर उपासमारीची वेळ येऊ नए या दृष्टीने तात्काळ पावल उचलने आवश्यक असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होतांना दिसत आहे....
*आग्रलेख-राज्यात लॉक डाऊन*
पत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर
पत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर
कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.पाहा व्हिडीओ
https://twitter.com/PIBHindi/status/1242776983060140033?s=19
IT IS ABSOLUTELY WRONG THAT JOURNALISTS AND DOCTORS ARE ASKED BY SOCIETIES TO VACATE THEIR ACCOMMODATIONS. THEY ARE PLAYING AN IMPORTANT ROLE IN MAKING PEOPLE AWARE ABOUT THE CURRENT #COVID19 SITUATION: UNION MINISTER @PRAKASHJAVDEKAR#INDIAFIGHTSCORONA#21DAYLOCKDOWNPIC.TWITTER.COM/DJE0D1OVU8
— PIB INDIA (@PIB_INDIA) MARCH 25, 2020
सोमवार, २३ मार्च, २०२०
कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्यास घाबरून जाऊ नका, त्वरीत या नंबरवर कॉल करा
कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्यास घाबरून जाऊ नका, त्वरीत या नंबरवर कॉल करा

डेस्क स्पेशल | आपल्याला जर कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आल्यास घाबरून जाऊ नका. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कोरोना व्हायरस संदर्भात काही हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. आपण किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला ताप, खोकला, डोकेदुखी, शरीरावर वेदना इत्यादीसारख्या कोरोनाची लक्षणे दर्शविल्यास. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. येथे आम्ही देशभरात कोरोना व्हायरसचे नमुना केंद्र आणि हेल्पलाइन क्रमांक देत आहोत. आपण त्यांना त्यावर कॉल करून मदत मिळवू शकता.
देशात कोरोनाचा कहर थांबवण्याच्या अधिक हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. अशा परिस्थितीत, सामान्य नागरिक म्हणून आपण नियमांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या घरात किंवा आपल्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास घाबरून जाण्याची गरज नाही.
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत. यावरून नागरिकांना 24-तासांची माहिती किंवा या मदत डेस्कद्वारे मदत मिळवू शकतात.
केंद्र सरकारने कोरोना विषाणूवर एक मदतनीस स्थापित केले आहे. My Gov हेल्प डेस्क नंबर 9013151515 वर व्हॉट्सअॅपवर मेसेज करून कधीही कोरोना संबधित माहिती विचारता येऊ शकते. 24 तासांचा एक हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला आहे. हे मदत लाईन क्रमांक + 91-11-23978046 आहेत. एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1075 देखील आहे. आपण ईमेलद्वारे कोरोना विषाणूशी संबंधित माहिती किंवा सूचना देखील सरकारला विचारू शकता. यासाठी ncov2019@gov.in हा ईमेल आयडी जारी करण्यात आला आहे.
राज्यांचे हेल्पलाईन क्रमांक
महाराष्ट्र 020-26127394
उत्तर प्रदेश 18001805145
आंध्र प्रदेश 0866-2410978
अरुणाचल प्रदेश 9436055743
आसाम 6913347770
बिहार 104
छत्तीसगड 104
गोवा 104
गुजरात 104
हरियाणा 8558893911
हिमाचल प्रदेश 104
झारखंड 104
कर्नाटक 104
केरळ 0471-2552056
मध्य प्रदेश 0755-2527177
मणिपूर 3852411668
मेघालय 108
मिझोरम 102
नागालँड 7005539653
ओडिशा 9439994859
पंजाब 104
राजस्थान 0141-2225624
सिक्किम 104
तामिळनाडू 044-29510500
तेलंगाना 104
त्रिपुरा 0381-2315879
उत्तराखंड 104
पश्चिम बंगाल 1800313444222, 03323412600
केंद्र शासित प्रदेश हेल्पलाइन क्रमांक
अंदमान आणि निकोबार 03192-232102
चंदीगड 9779558282
दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 104
दिल्ली 011-22307145
जम्मू-काश्मीर 01912520982, 0194-2440283
लडाख 01982256462
लक्षद्वीप 104
पुडुचेरी 108
महाराष्ट्रात संचारबंदी लागु
रविवार, २२ मार्च, २०२०
आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू *घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शनिवार, २१ मार्च, २०२०
घरातल्या घरात विवाह सोहळा पार पाडत या जोडप्याने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शुक्रवार, २० मार्च, २०२०
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून दोन दिवसीय दुकाने व आस्थापना बंदचे आदेश
मंगळवार, १७ मार्च, २०२०
परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पी.एम.किसान कार्ड चा लाभ घ्यावा-सभापती सौ.मीराताई दादासाहेब टेंगसे
कर्मचाऱ्यांचा आनंद क्षणिक ठरला, सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Coronavirus Impact : सरकारचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद
त्यांच्यावर उपचार चालू असून आजच (मंगळवार) कोरोनाचा देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिला बळी मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात झाला आहे. एका 64 वर्षीय रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वांना काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
शनिवार, १४ मार्च, २०२०
वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला; ट्रॅक्टर पळवले
*सम्यक संगर वृत्तपत्राच्या बातमीची जिल्हाधिकारी यांच्याकडून दखल,रोड लगतच्या वीटभट्ट्या तीन दिवसात हटवण्याचे आदेश,पाथरीच्या तहसीलदाराच्या उलट्या बोंबा*
याबाबत सम्यक संगरन रोखठोक सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून अनाधिकृत वीटभट्ट्याचा हा प्रकार उघडकीस आणला आहे या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी पाथरी तहसीलदार यू.एन कांगणे यांना 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या अनधिकृत वीटभट्ट्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यानंतर तहसीलदार यू.एन. कांगणे यांनी संबंधित वीट भट्टी धारकांना नोटिसा काढल्या खऱ्या पण कर्तव्यात कसूर करत आत्तापर्यंत एकाही वीटभट्टी धारकांवर कायदेशीर कार्यवाही तर केली नाहीच पण संबंधित विट भट्ट्या बाबत व यांच्यामुळे जनतेच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत सडेतोड लिखाण करणाऱ्या सम्यक संगर या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीस अप्रत्यक्षरीत्या धमकावण्याचा प्रयत्न केला या घटनेचा पाथरी तालुका पत्रकार संघाने तातडीने निषेध नोंदवला.यापुढे पुराव्यानिशी सत्य वृत्त लिहिणाऱ्या पत्रकारांना तहसीलदारांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला जिल्हाधिकारी यांच्या अधिकाराचे पालन करून वीटभट्ट्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात एवजी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला बगल देत पत्रकारांवर दबाव आणण्याचे तंत्र पाथरी तहसील चे तहसीलदार यु.एन. कांगणे यांनी वापरून उलट्या बोंबा मारायला सुरू केले आहे.
शुक्रवार, १३ मार्च, २०२०
कोरोनामुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू; खबरदारीसाठी व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
युवानेत्या प्रेरणाताई वरपुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ढालेगाव येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप
परभणी जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रश्न सोडववण्यास मी कटीबद्द राहील:- प्रेरणा ताई वरपूडकर
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...