मंगळवार, १७ मार्च, २०२०

Coronavirus Impact : सरकारचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद

Coronavirus Impact : सरकारचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद


 
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून राज्य मंत्रिमंडळाने आगामी 7 दिवस राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत.
त्यांच्यावर उपचार चालू असून आजच (मंगळवार) कोरोनाचा देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिला बळी मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात झाला आहे. एका 64 वर्षीय रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वांना काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक चालु असून आत्तापर्यंत काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजेच आगामी 7 दिवस राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा देणारी कार्यालये चालु असणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी काही मोठे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...