मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

Covid -19, काळात स्थलांतरावरून परत आलेल्या कुटुंबियांना तहसील कार्यालय पाथरी व संकल्प मानव विकास संस्थाच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप....

Covid -19, काळात स्थलांतरावरून परत आलेल्या कुटुंबियांना तहसील कार्यालय पाथरी व  संकल्प मानव विकास संस्थाच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप....


पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे राजारामबापू साखर कारखाना जिल्हा सांगली येथून स्थळांतरावरून 48 कुटुंब आले असून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत होम क्वारंटाईन केले आहे त्यांना जीवन आवश्यक वस्तूची आवश्यकता आहे अशी तहसील कार्यालय पाथरी यांना माहिती मिळाली त्यामुळे पंचायत समिती सभापती सदाशिव थोरात आणि तहसीलदार  संकल्प संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांना जीवनश्यक वस्तू वाटप करण्यात आली त्यावरून  संकल्प संस्थेच्या वतीने 30 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे देण्याचे निर्णय झाला,
त्यानुसार दिनांक 28 एप्रिल रोजी  पाथरी तहसीलदार मा. कांगणे साहेब , पंचायत समिती सभापती सदाशिव थोरात, मंडळ अधिकारी, भरकड साहेब, संकल्प संस्थेचे समन्वयक विठ्ठल साळवे, , राजू साठे, यांनी मरडसगाव येथे जाऊन स्थलारावरून 28 कुटूंबातील  लोकांची विचारपूस करून संकल्प संस्थेच्या वतीने आपणास हे जीवनावश्यक वस्तू चे वाटप करीत आहोत, आपण स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्यावी आणि पाथरी तालुका करोना मुक्तीसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली , प्रसंगी 30 लोकांना जीवनाआवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. 

पुढील आठवड्यात संकल्प संस्थेच्या वतीने      प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, परभणी जिल्ह्यातील 56  गावातील 2387 आणि जालना जिल्ह्यातील 1868 कुटुंबाना साबण, सॅनिटीझर, मास्क, किशोरी मुलींसाठी सॅनिटरी पॅड, 10 वी च्या 748 मुलांसा ठी work book, खेळण्याचे सहित्य दुसऱ्या टप्यात  वाटप करणार आहोत असे  संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...