बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

**मरावे परी अवयव रुपी उरावे** अवयव आणि देहदान महासंघ मुंबई आयोजित औरंगाबाद ते तुळजापूर जनजागृती पदयात्रेचे उद्या पाथरीत आगमन..

**मरावे परी अवयव रुपी उरावे**                                   अवयव आणि देहदान महासंघ  मुंबई आयोजित औरंगाबाद ते तुळजापूर जनजागृती पदयात्रेचे उद्या पाथरीत आगमन..
पाथरी-प्रतिनीधी--
       अवयवदान आणी देहदान महासंघ आयोजित औरंगाबाद ते तूळजापुर जनजागृती पदयात्रेचे आगमन उद्या दी३० वार शुक्रवार रोजी पाथरीत आगमन होणार असल्याची माहिती डॉ.जगदीश शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दीदी आहे.    या अनुषंगाने रोटरी क्लब पाथरी-मानवत च्या  वतीने ओंकार हास्पिटल होटल सीटी प्राईडच्या पाठीमागे अवयव दानासाठी  जनजागृती पदयात्रा करणाऱ्या टीम सोबत मिळून आपल्या परिसरातील मंडळी व विध्यार्थ्यांसाठी एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करत आहे....                           
      जगणे कोणाला नको आहे ? पण दुर्दैवाने मनुष्य बऱ्याच वेळी अकस्मात काळाचा बळी पडतो.                  
आपल्या देशात अपघातात मेंदू निष्क्रिय झाल्यामुळे मरण   पावणाऱ्या लोकांची संख्या जगात सर्वात जास्त आहे,अशा  व्यक्तींची प्रमुख अवयव सहसा निरोगी असतात,व वेळीच प्रत्यारोपित केले तर गरजू रुग्णास,डोळे,लिव्हर,हृदय ,किडनी,त्वचा इत्यादी 9 अवयव भेटू शकतात.                                   
कल्पना करा एखाद्याच्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या  आहेत व त्या बदलल्या नाही तर  काही दिवसाचेच आयुष्य असणार आहे,किडनी भेटत नाहीये आशा वेळी जर अचानक किडनी भेटली तर?मरनोपरांत ही लोकांची मदत करणे व स्वतःच्या मृत्यू नंतरही अवयवरुपी जगण्याचा हा एकमेव पर्याय होय.                            तरी सर्वांनी आजच्या काळाची  खूप मोठी गरज असलेल्या अवयवदान मार्गदर्शन या  कार्यक्रमात सहभागी व्हावे व संबंधितची सखोल माहिती घ्यावी ही विनंती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...